‘ओबीसी नेतेच ओबीसी समाजाला मुर्ख बनवताहेत’; राठोडांनी स्पष्टच सांगितलं

‘ओबीसी नेतेच ओबीसी समाजाला मुर्ख बनवताहेत’; राठोडांनी स्पष्टच सांगितलं

Haribhau Rathod Criticized OBC Leaders : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. आज नगर शहरात ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी ओबीसी नेत्यांना फटकारले आहे.

Maratha Reservation : ‘माझा फॉर्म्युलाच सोप्पा, फक्त अर्धा तास द्या’ हरिभाऊ राठोडांची शिंदे-फडणवीसांना विनंती

ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी जनजागरण यात्रा काढली आहे. आता यात्रेच्या माध्यमातून ओबीसींना भयभीत केले जात आहे. राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ मात्र मराठा आरक्षण देण्याबाबत विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असे स्पष्ट करत आहेत. भुजबळ मात्र हे सांगत नाहीत की मराठा समाजाला आरक्षण कसे देणार. ओबीसी समाजाला भावनात्मक पद्धतीने भडकावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून भाजपात जाण्याची त्यांची तयारी आहे. आता तायवाडे आणि भुजबळ दोघेही नागपुरकडे झुकले आहेत. ओबीसींना उघडपणे मूर्ख बनवत आहेत अशी टीका राठोड यांनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube