एकही सुट्टी न घेता काम करत राहिलो; बायकोलाही सांगितलं होत, राजीनाम्यानंतर जयंत पाटील भावूक

एकही सुट्टी न घेता काम करत राहिलो; बायकोलाही सांगितलं होत, राजीनाम्यानंतर जयंत पाटील भावूक

Jayant Patil Speech : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अखेऱ आज प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. दरम्यान, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. (Patil) 7 वर्षे एकही सुट्टी न घेता आपण पक्षासाठी काम केल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले. बायकोलाही मी हे सांगितलं, असं म्हणताना जयंत पाटील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न झाले. मुंबई महापालिका निवडणुकात एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला, असे म्हणत जयंत पाटलांनी सरकावर हल्लाबोल केला. शेतकरी रोज विविध संकटाना तोंड देत आहे, शेतकऱ्याने बैल नाही म्हणून नांगरला जुंपून शेती करत असल्याचं चित्र महाराष्ट्राने पहिल, असं कधी आधी झालं नव्हतं असं म्हणज पाटील यांनी थेट सरकारवर घणाघात केला.

आपल्या पक्षाची दुसऱ्या पक्षासारखी परिस्थिती नव्हती, तरीदेखील दोन अमोल माझ्यासोबत होते. एक अमोल कोल्हे आणि एक अमोल मिटकरी, सध्या मिटकरी तिकडे गेले. त्यावेळी आपण 54 जागा जिंकल्या, 17 टक्के मतदान आपल्याला मिळालं. त्यावेळी सत्ता आली आणि कोरोना आला. राजेश टोपे यांचं काम कुणीही विसरणार नाही. पण, मतदारसंघांतील लोक कसे विसरले माहिती नाही, असं म्हणत टोपे यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला.

सामान्य माणसाचा थेट संपर्क शरद पवारांसोबत झाला. त्यावेळी परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. 7 हजार 600 किमी आम्ही प्रवास त्यावेळी आम्ही केला होता. जिथ आम्ही निवडणुका लढत नव्हतो, तिथ देखील आम्ही पोहोचलो. शरद पवार यांच नाव घेतलं की महाराष्ट्रात कोणत्याही गावात 50 कार्यकर्ते सहज मिळतात, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

मधल्या काळात पक्ष फुटला, आम्ही त्यावेळी पॅनिक न होता जागेवर राहण्याचा निर्णय घेतला आणि अपात्रतेची कारवाई करण्याबाबत आम्ही त्याच रात्री विधानसभा अध्यक्षांकडं प्रस्ताव दिला. लोकसभेला आपल्याला प्रचंड यश मिळाल. इथ बसलेले 8 खासदार हे शरद पवार यांच्या कष्टाचे फळ आहे. जनतेने आपल्याला साथ दिली. आपण लोकसभेला 10 जागा लढवल्या आणि प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे निवडणुकीत 8 खासदार आपले निवडून आल्याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.

Video :प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंना आर आर आबांची आठवण; म्हणाले, मी त्यांच्याप्रमाणेच लढणार अन्

आम्ही विधानसभा निवडणुकीत पुन्हा यात्रा काढली, प्रचंड प्रवास झाला. शेवटची सभा माझ्या मतदारसंघात होती. त्यावेळी प्रचंड पाऊस पडला, सगळे लोक निघून गेले. माझीच अब्रू जातेय की काय अशी परिस्थितीत होती. परंतु, पाऊस संपल्यानंतर मोठ्या संख्येने लोक सभेला आले. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा मी प्रयत्न केला. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. वेगळं फाउंडेशन काढलं नाही, असलं पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, आम्ही 25 वर्षे या पक्षात आहोत असंही जयंत पाटील म्हणाले.

त्याचबरोबर साहेबांनी निर्णय घेतलेला असतो, त्यावेळी बराच विचार करून निर्णय घेतला असतो. 2,633 दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मला अध्यक्षपदाची संधी साहेबांनी दोनदा दिली. आमची बेळगावला सभा होती, त्यावेळी शरद पवारांनी माझ्यावर जबाबदारी दिली. इतके दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आता ही योग्य वेळ आहे की मी आता या पदावरून बाजूला व्हावं. मी साहेबांना विनंती करतो, त्यांनी नवीन अध्यक्ष निवडावा, असं म्हणत जयंत पाटील यांनी आपण पायउतार होणार असल्याचं स्पष्ट केलं.

माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला, 7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितलं, असं म्हणताना जयंत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच, दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर, शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube