मंत्रिपदानंतर आता आमदारकीही… करुणा मुंडे यांचा खळबळजनक दावा

हे बाबा लोक नेता लोकांना महिला तस्करी करतात. धीरेंद्र शास्त्रीला चॅलेंज करते मी पण ब्राह्मण जातीची आहे.

News Photo   2026 04 26T152132.983

करुणा मुंडे यांनी विविध विषयावर मतं मांडली. (Beed) मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात त्यांनी मत मांडलं. तर त्याचवेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाबद्दल खळबळजनक दावा केला. त्यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बागेश्वरबाबा स्वयंघोषीत बाबा आहे. बागेश्वर बाबाची शिवरायांबाबत बोलायची लायकी नाही. तर आठ महिन्यांआधी धीरेंद्र शास्त्रीवर महिला तस्करीचा आरोप असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.

बागेश्वर, आसाराम, खरात हे सगळे बीजेपी घोषीत बाबा असल्याचा आरोप त्यांनी केला. बाबा लोकं नेत्यांसाठी महिला तस्करी करतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. स्वयंघोषित जे बाबा लोक आहेत, या सगळ्या लोकांना राजकीय आश्रय भेटते. त्यांच्यामुळे हे लोक एवढे मोठे होतात. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल तुम्ही काय बोलणार, तुमच्यासारखे बाबा लोक लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची तुमची लायकी सुद्धा नाहीये. किती बाबा लोक जेलमध्ये गेले, पण परत तयार होतात.

तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, बीड कारागृहात चाललय काय?

हे बाबा लोक नेता लोकांना महिला तस्करी करतात. धीरेंद्र शास्त्रीला चॅलेंज करते मी पण ब्राह्मण जातीची आहे. तुमची लायकी काय आहे मी दाखवून देईल. तुम्ही वन टू वन माझ्यासोबत डिबेट मध्ये या, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. धनंजय मुंडें यांची आमदारकी पुढील २ ते ३ महिन्यात जाणार असा मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला. यापूर्वी धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

मराठी भाषा कठीण

मनसे आणि भाजप लोकांची दिशाभूल करतायत. मुंबईत अनेक रिक्षा चालक परप्रांतीय आहे. मराठी माणसं या व्यवसायात कमी आहेत. मी 27 वर्ष धनंजय मुंडे सोबत राहून मला मराठी नीट येत नव्हती. 2 वर्षापूर्वी राजकारणात आल्यावर मराठी शिकली. मराठी भाषा कठीण आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. रिक्षाचालकांना मराठी सक्ती करू नका अशी विनंती करणार आहे.

परप्रांतीय लोक सोडून गेले तर आर्धी मुंबई खाली होईल, मंत्र्यांच्या बंगल्यातपण अनेक युपी, बिहारवाले काम करत आहेत. जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आंदोलन करणार. बिहार आणि यूपी चे लोक जरी परत गेले ना मुंबई सोडून तर आधी मुंबई खाली होणार आणि स्वत:च्या घराचे काम स्वत:ला करावे लागणार. देवा भाऊंच्या बायकोला पण काम करावे लागणार असे करुणा मुंडे म्हणाल्या.

follow us