धुळे : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Agitation of ST employees) पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चांगलाच गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कामगारांची शेवटपर्यंत मागणी होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून होते. दरम्यान, […]
Maratha Reservation : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या […]
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका व्यक्तीसोबत सोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन भूमिका मांडण्याची केली. त्यावरून वादावादी होताच मराठा आंदोलकाने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी ‘जुलाबराव’ असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चिडले असून त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकाने […]
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांनी वाद […]
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मगाणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यांपुढं नमतं घेतांना दिसत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका ३० वर्षीय युवकाने तलावात उडी […]
Mohan Bhagwat on Reservation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथे आरक्षणावर मोठे विधान केले आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर ओबीसींनाही आरक्षण मिळाले, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत […]