नाफेडची कांदा खरेदी निव्वळ दिशाभूल; पटोलेंनी सगळा इतिहासच सांगितला

नाफेडची कांदा खरेदी निव्वळ दिशाभूल; पटोलेंनी सगळा इतिहासच सांगितला

Nana Patole News : कांद्याची संभाव्य महागाई नियंत्रित करून निवडणुकीच्या लोकांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मात्र विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. काँग्रेस नेते सरकारवर तुटून पडले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकावर जोरदार प्रहार केले.

कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी का करत नाहीत? याचे उत्तर जनतेला द्या, असा जाब पटोले यांनी सरकारला विचारला.

Onion Price Crisis : ‘शरद पवार 10 वर्ष कृषिमंत्री पण..,’ मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला

मागील वेळी जेव्हा कांद्याचे दर पडले होते त्यावेळीही नाफेडमार्फत कांदा खरेदी करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु, नाफेडने काही कांदा खरेदी केला नाही. तूर, चणा आणि कापूसही खरेदी केला नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे ते जर खराब झाले तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपाचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला.

‘शेतकरी थांबायला तयार पण, केंद्र सरकारने.. कांदाप्रश्नी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

कांदा प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. कांद्याच्या दरावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात असताना मंत्री मात्र लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. कांदा परवडत नसेल तर महिना दोन महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं. असा उद्धट सवाल मंत्री भुसे करतात. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची, हे सत्तेच्या मस्तीत आहेत पण जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube