Video : नागपुरात हिंसाचार घडवणाऱ्यांची प्रॉपर्टी विकली जाणार; फडणवीसांनी दिले थेट आदेश

Video : नागपुरात हिंसाचार घडवणाऱ्यांची प्रॉपर्टी विकली जाणार; फडणवीसांनी दिले थेट आदेश

CM Devendra Fadnavis on Nagpur violence : औरंगजेबाची खबर काढून टाका यावरून नागपुरमध्ये आंदोलन झाली अन् पुढे दंगलही झाली. त्यानंतर महाराष्ट्र एक वातावरण निर्माण झालं. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Fadnavis ) यांच्यावरही जोरदार टीका झाली. दरम्यान आज फडणवीस यावर सविस्तर बोलले आहेत. नागपूरमधील हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केलं जाणार आहे. झालेल्या नुकसानाची किंमत काढली जाणार आणि ती वसून करणार. जर दंगेखोरांनी त्याचे पैसे भरले नाहीत तर, त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल असा थेट इशारा मुंख्यमंत्री अन् गृमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

नागपूर दंगलीनंतर फडणवीसांची राणेंना समज? पण बाहेर येताच राणे म्हणाले

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र, कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी जमाव आला, तोडफोड केली. जाळपोळ केली. लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी चार पाच तासातच या संपूर्ण दंगलीला अटकाव केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज होते, खाजगी लोकांनी जे मोबाईलवर चित्रीकरण केलं ते असेल पोलिसांनी जे चित्रीकरण केलं, जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आरोपींमध्ये अल्पवयीन 

अजूनही आयडेंटिफिकेोशन सुरू आहे. अजूनही लोक आहेत. त्यांनाही अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगेखोरांना मदत करताना दिसतोय त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता आहे. आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहे, 12 लोकं हे 18 वर्षांच्याखालचे आहेत. त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. तसंच, ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल.

नुकसान भरपाई देणार

ज्यांचं नुकसान झालं, गाड्या फुटल्या, अर्धवट गाड्या फुटल्या त्या सर्वांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसांत दिली जाईल. आता जो काही आपण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे थोडं जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचवेळी पोलीस सजग राहील. कुणी परत असा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाणार आहे. जे नुकसान झालं ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरमध्ये ९२ नंतर असा मोठा प्रकार घडला नाही. आता दंगेखोरांना अटकाव केला नाही तर ते सुटतील. त्यामुळे पोलीस कोणताही टॉलरन्स सहन करणार नाही.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube