शिवसेना आजही खंबीर अन् अभेद्यच; ज्यांना जायचं ते गेले, राऊतं बडगुजरांवर काय बोलले?

Sanjay Raut Press Conference : सुधाकर बडगुजर हे आमच्या पक्षात नाहीत. (Raut) जे आमच्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर आम्ही का मत व्यक्त करावं? मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. तसंच, नाशिकचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. मात्र, माझ्याकडं कोणतीही नाव नाहीत. कुणी कुठही गेल तरी नाशिकमधली शिवसेना खंबीर असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दोन दिवसावर शिवसेनेचा वर्धानपिदन आहे, दोन्ही शिवसेनेकडून तयारी सुरु आहे, त्यावर राऊत म्हणाले की, ती शिवसेना नाही, तो शिंदेंचा गट आहे. अमित शाह त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगावर दबाव आणून अमित शाहंनी तो गट स्थापन केला. महाराष्ट्र, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी हे केलं. त्याला शिंदे बळी पडले हा एक गट आहे, त्यांच्याकडे भ्रष्टाचारातून जमवलेला प्रचंड पैसा आहे असा थेट घणाघात राऊतांनी यावेळी केला.
Video : भाजप नेत्याने इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी झटकली; म्हणाले, सूचना दिल्या होत्या, पण
अजित पवारांबद्दल चुकीच दाखवण्याची कोणाची हिम्मत आहे का? ध चा मा करायला आता आनंदीबाईंच राज्य आहे का? अजित पवावर काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं धीरुभाई अंबानी देशातले महत्त्वाचे उद्योगपती आहेत. आज जे रिलायन्सच साम्राज्य उभं आहे, त्याचे संस्थापक धीरुभाई आहेत. धीरुभाईंच्या मागे कधी ईडी लागली नाही, त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली नाही असा टोलाही राऊतांनी अजित पवारांना लगावला आहे.
मावळच्या जनतेला पैशात तोलू नका, नाहीतर उरले सुरले तुमचे जातील असं स्थानिक आमदाराने म्हटलं. त्यावर राऊत खवळले, अरे सोड रे, कोण तू, 100 कोटी खर्च करुन मावळच्या जनतेला विकत घेऊन तू आमदार झालास. अजित पवारांबरोबर गेलास ना, अशा धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्ही चोर, लफगें नाही असं राऊत म्हणाले आहेत.