औरंगाबाद : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचं शिंदे-फडणवीस सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलंय. तसेच निवडणूक आयोगाने आम्हांला बाळासाहेबांची शिवसेना नावाने मान्यता दिली असून आम्ही म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असंही ते म्हणाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख […]
परभणी : जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील […]
पुणे : जैन धर्माचे पवित्र स्थळ श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाच्या प्रश्नासंदर्भात जैन समाजाच्या संप्रदायाने आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या तीव्र भावना समजून घेतल्या आहेत. नुकताच सम्मेदजी शिखरजी तीर्थक्षेत्राबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्र परिसरात […]
मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नसल्याचं भाजप महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. त्या मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाकयुध्द आता चांगलंच पेटलं आहे. चित्रा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन उर्फीविरोधातली त्यांची कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहणार […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरा आधी जिल्हा विभाजन करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नामांतरा बरोबरच जिल्हा विभाजनाच्या प्रश्नानेही डोके वर काढले आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, नामांतराला आमचा कुणाचाही विरोध नसणार आहे. आमची मागणी आहे की या नामांतरा आधी जिल्हा विभाजन […]