Sanjay Raut : ‘अपात्रतेआधीच मॅच फिक्स, निर्णय दिल्लीत झालाय’; राऊतांच्या आरोपाने खळबळ!

Sanjay Raut : ‘अपात्रतेआधीच मॅच फिक्स, निर्णय दिल्लीत झालाय’; राऊतांच्या आरोपाने खळबळ!

Sanjay Raut on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल देणार आहेत. आज दुपारी नार्वेकर निकालाचे वाचन करतील अशी शक्यता आहे. मात्र हा निकाल येण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) या प्रकरणी खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. सर्वकाही आधीपासूनच फिक्स झालं आहे. त्यामुळे आजच्या निकालाची फक्त औपचारिकताच राहिली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी आरोप केले आहेत.

Sanjay Raut : निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण.. राऊतांनी ठणकावलं!

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केला. संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रात रोड शो करणार आहेत. तर दुसरीकडे आमदार अपात्रतेचा निकाल असतानाही मुख्यमंत्री शिंदे मात्र दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. याचाच अर्थ असा आहे की मॅच फिक्सिंगबाबत दोघांनाही पूर्ण माहिती आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. यासंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते काल वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते.

MLA Disqualification : आमदार पात्र की अपात्र? ठाकरे अन् शिंदेंसाठी आजचा दिवस महत्वाचा

महायुतीच्या सरकारसमोर मराठा आरक्षण आणि आजचा निकाल हे दोन मोठे प्रश्न आहेत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकेल का? याची देखील उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ना निर्माण झाला तर त्यावरील उपाययोजनांसाठी ही बैठक आयोजित केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube