नारायण राणेंबद्दल विधान! फडणवीससाहेब, भरत गोगावलेंची चौकशी करा; ठाकरेंनी ठेवलं बोट

Aaditya Thackeray On Bharat Gogawale : शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सिंधुदूर्मध्ये आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात एक मोठं विधान केलंय. नारायण राणे मर्डर, मारामाऱ्या करुनच इथंपर्यंत पोहोचले असल्याचं भरत गोगावलेंनी (Aaditya Thackeray) म्हटलंय. त्यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरलायं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भरत गोगावले यांची चौकशी करायला हवी, पोलिसांनीही माहिती द्यायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीयं. ते पत्रकार परिषदेत बोलत होतं.
मुंबईतल्या महामोर्चाची जय्यत तयारी; उद्याचा रविवार निर्णायक…मनसे, ठाकरे गटाच्या जोर बैठका
पुढे बोलताना ते म्हणाले, नारायण राणे खून करुन पंतप्रधानांच्या बाजूला बसू शकतात, म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेलाही किती मोठा धोका यांनी निर्माण केला आहे, याचा विचार करा. बाकी आता खाकीत रुमाल नाही म्हणून मी बोलू नाही शकत. एखादा जबाबदार मंत्री हे विधान करु शकतो. पोलिसांनी त्यांना बोलावून त्यांच्याकडू माहिती चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही ही चौकशी करायला हवी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
काय म्हणाले होते भरत गोगावले?
नारायण राणे एवढ्या सहजासहजी उंचीवर गेलेले नाहीत, अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं. वेगळं काही सांगण्याची आवश्यकत नाही, असं विधान भरत गोगावले यांनी यावेळी केलंय.
दरम्यान, सिंधुदूर्गमधील कुडाळमध्ये काल शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेही उपस्थित होते. त्यांच्यासमोर मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल विधान केलंय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.