Aasha Bhosle : राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नाही…

Aasha Bhosle : राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नाही…

Aasha Bhosle News : राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नसल्याचं विधान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Aasha Bhosle) यांनी केलंय. सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या (Hindi Language Compulsary) मुद्द्यावरुन घमासान सुरु असतानाच आशा भोसले यांनी हे विधान केलंय. काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आशा भोसले राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आयोजित केलेल्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात एका कार्यक्रमात दिसून आल्या होत्या. ठाकरे घराण्याशी मंगेशकर कुटुंबियांचे संबंध सर्वांना माहितच आहे. राज ठाकरेंच्या मोर्चाच्या घोषणेनंतर भोसले यांनी केलेलं हे विधान चांगलंच चर्चेत आलंय.

‘भारतासोबत एक खूप मोठा व्यापार करार…’, डोनाल्ड ट्रम्पने कोणती मोठी घोषणा केली?

राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरुन येत्या 5 जुलै मोर्चाची घोषणा केल्यानंतर माध्यमांकडून हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आशा भोसले यांना सवाल करण्यात आला. त्यावर बोलताना आशा भोसले म्हणाल्या, राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. राजकारणातील आशिष शेलार मला माहित आहेत, बाकी कोणाशीही माझा संबंध नाही, असं विधान आशा भोसले यांनी केलंय.

क्रिकेटमध्ये मोठे बदल, आता एका चुकीमुळे संपूर्ण संघाला बसणार फटका, 5 धावा कमी होणार

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे संबंध सर्वश्रुत आहेतच. तसेच, ज्येष्ठ गायिका आशा भोसले कित्येकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचावर दिसल्यात. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला आशा भोसले यांनी हजेरी लावलेली. त्यावेळी भर मंचावरुन आशा भोसले यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळलेली आणि राज ठाकरे माझा दोस्त आहे, असं म्हणत त्यांचं तोंड भरुन कौतुकही केलं होतं. पण आता त्याच आशा भोसलेंनी मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते, इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही असे विधान केले आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात आशा भोसले यांनी राज ठाकरेंबद्दल मोठं विधान केलं होतं. कार्यक्रमात आशा भोसले म्हणाल्या, याठिकाणी सर्व दिग्गज मंडळी बसली आहेत. पण, मला का बोलावलं हेच मला कळालं नाही. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला. ते फार उत्साहात होते. ते मला त्यांच्या ‘ठाकरे’ आवाजात म्हणाले, आशाताई मला तुम्ही २७ तारखेला काही झालं तरी संध्याकाळी ६ वाजता हव्यात. यावर मी त्यांना म्हटलं, ‘६० वर्षं उशीर झाला बरं का’. तर त्यांनी म्हटलं, काव्यवाचन करायचं आहे आणि जरुर यायला पाहिजे आहे असं सांगितलं. मी आजारी होते, पण राज ठाकरेंना नाही कसं म्हणायचं. म्हणजे माझ्या बंगल्यात ज्या माणसाने एवढी मोठी महादेवाची पिंड आणून बसवली. त्याला मी नाही कसं म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणत का. त्यामुळे आज मी याठिकाणी आले, असल्याचं आशा भोसले यांनी स्पष्ट केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube