Bacchu Kadu Criticism On Ravi Rana : “एवढा लाचार माणूस पहिला नाही” रवी राणांवर बच्चू कडूंची जळजळीत टीका

Bacchu Kadu Criticism On Ravi Rana : “एवढा लाचार माणूस पहिला नाही” रवी राणांवर बच्चू कडूंची जळजळीत टीका

Bacchu Kadu Criticism Of Ravi Rana : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जसं जसं निवडणूक प्रचार पुढे जात आहे तसं तसं आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोचा स्थळ देखील खाली जात आहे.

एका जाहीर सभेमध्ये आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्‍चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जळजळीत टीका करत आमदार बच्‍चू कडू हे आमचे मोठे बंधू आहे मात्र त्यांची ओळख तोडीबाज म्हणून आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्‍तेची माहिती आपल्याकडे आहे. त्यांनी आमच्या विरोधात राजकारण करून नये, हे लक्षात ठेवा इथं गाठ रवी राणांसोबत आहे असा इशारा दिला होता.  तर आता आमदार बच्‍चू कडू यांनी देखील रवी राणा यांच्यावर टीका करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रवी राणा यांना उत्तर देताना आमदार बच्चू कडू म्हणाले, काही दिवसापूर्वी तुम्ही हात जोडून माफी मागत होते, विनंती करत होते तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे असं सांगत होते मात्र आज सांगत आहे बच्चू कडू पैसे खातो. अरे सरडा तरी वेळाने रंग बदलतो, यावरून मतदारसंघातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजे हा आमच्याबरोबर असा वागतो तर मतदारसंघातील सामान्य लोकांबरोबर कसं वागत असेल.

रवी राणा यांची हार निश्चित आहे यामुळे ते हरलेल्या मानसिकतेतून असे वक्तव्य करत आहे. तुम्ही हे जाणून घ्या, तुमच्या रॅलीमधील अर्ध मते आम्हालाच मिळणार. या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा (Navaneet Rana) चौथ्या क्रमाकांवर राहतील, असं ही आमदार बच्चू कडू म्हणाले.

आम्ही छाती फाडून तयार आहोत

तर रवी राणा यांना उत्तर देत बच्चू कडू म्हणाले, मी संपूर्ण हिंदुस्थानात रवी राणा यांच्या एवढा लाचार माणूस पहिला नाही. त्यांनी भाजप, राष्ट्रवादीबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी सेटलमेंट केली. मला तुम्ही तुमचे काळे धंदे बाहेर काढायला लावू नका. तुमची जुनी सवय आहे नसलेल्या, उखरून काढायची.

रवी राणा यांच्याकडून आज नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आम्ही यासाठी छाती फाडून तयार आहोत, अशी टीका ही बच्चू कडू यांनी केली.

तैवानच्या भूकंपात 9 जणांचा मुत्यू, 70 जण अडकले, दोन भारतीय बेपत्ता

निवडणुकीत रडणं चांगलं नाही

तर नवनीत राणा यांच्यावर टीका करत आमदार बच्चू कडू म्हणाले, यावेळी जनतेच्या न्यायालयात नवनीत राणा हरणार आहे. रडणं म्हणजे केवळ सहानुभूती घेण्यासारखं आहे, तुम्ही आता आणखी किती दिवस रडणार आहात?

निवडणुकीत रडणं चांगलं नाही, जर तुम्ही सामान्य लोकांसाठी रडला असता तर आम्हाला किव वाटली असती. अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज