नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, मुलाला मंत्रिमंडळातून हाकला; हर्षवर्धन सपकाळांनी गोगावलेंचा मुद्दा उचलला

  • Written By: Published:
नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, मुलाला मंत्रिमंडळातून हाकला; हर्षवर्धन सपकाळांनी गोगावलेंचा मुद्दा उचलला

Harshwardhan Sapkal On Narayan Rane: खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर केले आहेत. राणे यांना मी जवळून पाहिले आहे, असा वादग्रस्त विधान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहेत. त्यावरून आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी एक मोठी मागणी केलीय. नारायण राणे यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचा मुलगा नितेश राणेंना मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे. तसेच खुनाचा गुन्हा नोंदविला पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केलीय.

सपकाळ म्हणाले, सत्तेतील मंत्री भरत गोगावले यांनी केलेले विधान हे गंभीर आहे. राणे कुटुंबाला सत्तेत ठेवू नये. नारायण राणे यांचे खासदारकी काढून घेतली पाहिजे. त्यांच्या मुलाचे मंत्रिपदही काढून घ्यावे. तर गोगावले यांच्याकडून माहिती घेऊन राणेंविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केलीय. (Harshwardhan Sapkal On Narayan Rane)


भाषासक्तीचे सूत्र रेशीमबागेतून

दादा भुसे हे नामधारी मंत्री आहेत. हे सातत्याने निदर्शनात येत आहे. रेखावार नावाचा अधिकारी डोक्यावर बसून ठेवला आहे. तो सर्व गोष्टी करत होते. दादा भुसे यांना याबाबत काहीच माहिती नव्हते. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती. यामध्ये सर्वासर्वे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. नागपूरच्या रेशीमबागेतून सर्व सूत्र हलत होते. दोन उपमुख्यमंत्री हे केवळ बघायचे भूमिका घेत होते. एकला चलो रे ही मुख्यमंत्र्यांचे धोरण यातून दिसून येत आहे, असल्याची टीका हिंदी सक्तीवरुन सपकाळांनी केलीय.


भाजप चेटकीण, काँग्रेसच्या नेत्यांना खाते

काँग्रेसचे धुळ्यातील नेते कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावर सपकाळ म्हणाले, कुणाल पाटील यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते. त्यांचे वडिल दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले आहेत. जनसेवा करण्यासाठी सुतगिरण्या, शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज आहे. मोठे जाळे संस्थांच्या माध्यमातून केले आहे. हे टाकलेले कुंपण काँग्रेसच्या विचाराच्या संरक्षणासाठी होते. परंतु कुंपणच शेत खाताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीकडे स्वतःचे नेते नाहीत. ते नेते तयार करू शकत नाही. भाजप चेटकिण आहे. काँग्रेसचे नेत्यांना ती खात आहे. अरे तुमच्यात धमक असेल तर कशाला काँग्रेसचे नेते तुमच्या पक्षात घेत असे चॅलेंजही हर्षवर्धन सपकाळांनी दिलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube