मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर आता त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून […]
मुंबई : ‘उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदावर ‘नियती’नेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.’ असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते तथा सचिव योगेश खैरे यांनी राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केल्याचं पाहा मिळत आहे. तर पुढे ते त्यांच्या या घोषणेवर […]
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीवर वक्तव्य केलं आहे. ‘राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नव्हे. राजकीय टीका केली तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतचं असतो.’ असं अजित पवार यांनी सांगितलं. असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या पार्थ पवार–शंभूराज देसाई भेटीचं समर्थन केलं आहे. ते सांगलीतील अंजनीतील आर. […]
अहमदनगर : ’22 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फिरून काँग्रेसचा प्रचार-प्रसार करत छोटे-मोठे कार्यकर्ते जोडले. आमच्या कुटुंबातील निर्णय होईपर्यंत पदवीधरची उमेदवारी जाहीर करू नका. असे काँग्रेस श्रेष्ठींना सांगत होतो. परंतु त्यांनी ती जाहीर केली आणि मग मात्र अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नाशिक पदवीधक मतदारसंघातून अपक्ष उभे राहणाऱ्या सत्यजित तांबेंनी आपण अपक्ष उभं राहण्याचा […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची आणि कायद्यानुसार पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. सुनावाणी दरम्यान न्यायमुर्ती बीआर गवई आणि न्यायमुर्ती विक्रम नाथ यांच्या घटनापिठाने सांगितले की, याचिकांमध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला […]
पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई महानगर पालिकेची चौकशी करतात. पुणे महानगर पालिकेत जो गोंधळ चालला आहे. त्याच्या बद्दल एकही ‘ब्र’ काढत नाहीत.’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी केली ते पक्षाच्या केशवनगरमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. शिंदे गटातील जे लोक ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत होते. […]