मोर्चा रद्दचं राऊतांचं ट्विट पण, उद्धव ठाकरेंचं ठरलं, 5 जुलैला निघणार विजयी मोर्चा

मोर्चा रद्दचं राऊतांचं ट्विट पण, उद्धव ठाकरेंचं ठरलं,  5 जुलैला निघणार विजयी मोर्चा

Hindi Language Row : राज्य सरकारने आज हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत (Hindi Language Row) या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आल्याचे ट्विट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते.  दरम्यान, यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी येत्या 5 जुलैला विजयी मोर्चा आणि सभा घेणार असल्याची माहिती दिली.

हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान) असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एकत्रित मोर्चा निघणार नाही हे स्पष्ट झाले होते. परंतु, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर यात मोठा ट्विस्ट आला आहे.

Video : मोठी बातमी! पहिलीपासून हिंदीसक्ती अखेर रद्द; जनमतापुढे फडणवीस सरकार नमले

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्य सरकारने हिंदी भाषेसंबंधीचे निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. 5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला. जीआर कोणी काढला होता. मागे हरिश्चंद्राची फॅक्ट्री पिक्चर आला होता. तसा भाजप खोट्याची फॅक्ट्री झाली आहे. अफवांची फॅक्ट्री झाली आहे. अफवा पसरवायच्या, खोटंनाटं कथानक तयार करायचं आणि मते मिळवायची हा भाजपचा धंदा झाला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच, 5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत असंही ते म्हणाले.

त्रिभाषा सूत्राबाबतचे निर्णय रद्द

हिंदी भाषा सक्तीला राज्यभरातून विरोध होत असतानाच महायुती सरकारने हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीतील पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्राबाबत माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव (GR) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील काय तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

सरकारच्या या निर्णयाला विरोधकांसह मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याच्या विचारात होते. आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसंच, एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केली. त्रिभाच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल.

हे मराठी माणसाचं यश! हिंदी GR’रद्दच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, फडणवीसांनाही दिलं ‘हे’ उत्तर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube