‘मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंनी सांगितली भविष्यवाणी

‘मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंनी सांगितली भविष्यवाणी

Udhav Thackeray News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्तांधाऱ्यावर जोरदार टीका करीत आहेत. मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची भविष्यवाणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रायगडच्या अलिबागमध्ये आयोजित सभेतून ते बोलत होते.

Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार लाभ?

उद्धव ठाकरे म्हणाले, शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. देशातील गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत, हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन करत आहे. तुमच्या पंतप्रधानांच्या मित्रापलीकडेही देश आहेत हे आता 10 वर्षानंतर त्यांना कळले आहे. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानूकडे जा? सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

तुम्ही शेतकऱ्यांना अतिरेकी समजत होतात आता त्यांच्याबद्दल बोलतायं. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच आमचं सरकार आल्यावर महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग 10 वर्ष काय केले? असा उपरोधिक सवालही उद्धव ठाकरे यांनी थेट मोदी सरकारवर केला आहे.

Budget 2024 Live Update : प्राप्तिकर मर्यादेत बदल नाही; आयुष्यमानचं जाळ वाढवणार

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. याशिवाय प्राप्तिकर परताव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मिंधे गटात भेकडे गेले आहेत. भेकडे तर गेलेच अजूनही कोणी असेल तर त्यांनी पण जा. ही भेकड जनता पार्टी आहे, नेते चोरणारी पार्टी, विचारशून्य पक्ष देशावर राज्य करतोयं आधी लोकसभा निवडणूक आहे. आता तळागाळातून सुरुवात नाहीतर
कळसावरच भगवा फडकावयचा आहे शिवरायांचा भगवा लाल किल्ल्यावर पुन्हा फडकवणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला आहे.

तसेच अलिबाग आणि रायगडकराना दोनदा गद्दारांना गाडायचं आहे. लवाद तुमच्याइकडचेच आहेत. हा लवाद महाराष्ट्राला लागलेला कलंकच आहे. याआधी मी कलंक म्हणलो होतो तेव्हा सत्ताधाऱ्यांना झोंबलं होतं. राहुल नार्वेकर हे कलंकच असून त्यांनी दहाव्या परिशिष्टाची चिरफाड केली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज