उमेश पाटलांची घरवापसी; पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, म्हणाले..मी दादांना
Umesh Patil Rejoin Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी (Umesh Patil) मुख्य प्रवक्ते पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) जाहीर सभेवेळी केलेल्या वक्तव्यामुळे उमेश पाटील नाराज झाले होते, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये परत जातील दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र उमेश पाटील यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केलाय.
PM मोदी महाकुंभात पोहोचले, गंगा पूजेनंतर संगम स्नान करणार
त्यासोबतच उमेश पाटील यांनी एक सोशल मिडिया पोस्ट देखील केलीय. यामध्ये त्यांनी मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा का दिला? हे स्पष्ट केलंय. सोबतच मी कधीही अजितदादांना सोडलं नव्हतं, असं देखील त्यांनी स्पष्ट (Maharashtra Politics) केलंय. कालच्या पक्षप्रवेशाने उमेश पाटील शरद पवारांसोबत जातील या अटकळांना पूर्णविराम लागला आहे.
विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. सोलापुर जिल्ह्यातील ‘मोहोळ विधानसभा’ या राखीव मतदारसंघामधील मातब्बर प्रस्थापित नेत्यांसोबत टोकाचे मतभेद झाले होते. त्यामुळं मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती, हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी आणि माझ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी मिळुन 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.
नंदुरबारध्ये रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं; बांबूच्या झोळीतून 15 किमीचा प्रवास
अजितदादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला, तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले. मी दादांना कधी सोडले नव्हते. फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो, हे सिद्ध करायचे होते. माझा देवगिरी येथे सर्व मंत्री, आमदार आणि पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे. मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते…फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती..इतकंच, अशी सोशल मिडिया पोस्ट उमेश पाटील यांनी केलीय.