Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?

Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?

Chhagan bhujbal On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर सध्या जोरदार टीका होत आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हण मी ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal ) यांनी यावेळी केले आहे.

पुढे म्हणाले की, अजित दादांनी सांगितलं त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा तर हे बरोबर आहे. आशीर्वाद दिले तर सोन्याहून पिवळे असणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाने विरोध केला आहे, दरम्यान महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा. दिवसांत सर्व्हेक्षण होऊ शकतं तर जातीनिहाय जनगणनाही करा, तर मनोज जरांगे यांच्या मागण्या देखील वाढतच चालल्या आहेत असंही भुजबळ म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी अजून 8 महिने मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. आपल्याला आणखी बरेच कामे करायची असून बरेच फिरायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेची कारवाईची टागंती तलवार असतानाही त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

Ahmednagar : ‘थोडं थांबा, लवकरच ‘मविआ’ सरकार येणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

मराठा आरक्षणाला वेगळं आरक्षण देण्यास आमचा आजिबात विरोध नाही, तर त्यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. संपूर्ण मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube