तब्बल १८ वर्षाच स्वप्न झालं साकार; आरसीबीने ‘IPL ट्रॉफी’वर नाव कोरलं, विराट कोहलीला अश्रू

तब्बल १८ वर्षाच स्वप्न झालं साकार; आरसीबीने ‘IPL ट्रॉफी’वर नाव कोरलं, विराट कोहलीला अश्रू

RCB Wins by Defeating PBKS : अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत विजय मिळवला. दरम्यान, गेली १८ वर्षांपासून खेळणारा विराट आज टीम विजयापर्यंत आल्यानंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी, ट्रॉफी जिंकण्याचं विराटच स्वप्न पूर्ण झालं.

आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसऱ्या बाजूला पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची 2014 नंतरची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली.

मला कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त व्हायचय; भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयला कळवलं

पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रियांश आर्या 24 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंह याने 26 करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरसीबीने पंजाबला ठराविक अंतराने झटके देत शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

पंजाबसाठी शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शशांकने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. शशांकाने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 61 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र त्यांचं हे योगदान आरसीबीला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube