रोहित शर्माच्या कसोटी कर्णधार पदाबाबत, सौरव गांगुलीचे मोठे विधान

  • Written By: Published:
रोहित शर्माच्या कसोटी कर्णधार पदाबाबत, सौरव गांगुलीचे मोठे विधान

विराट कोहलीनंतर रोहित शर्माला ( Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने यापूर्वी पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर 2022 च्या सुरुवातीला आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने (Virat Kohali) कसोटी कर्णधारपदाचाही निरोप घेतला. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कसोटी कर्णधार झाला. पण आता एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma)  कसोटी कर्णधार बनण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात आले आहे. (rohit-sharma-does-not-wanted-to-indian-test-captain-sourav-ganguly-and-jay-shah-convinced-him)

पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माला कसोटी कर्णधार होण्यासाठी राजी केले. यानंतर रोहित शर्मा कसोटी कर्णधारपदासाठी सज्ज झाला. वास्तविक, केएल राहुल आफ्रिका दौऱ्यावर कर्णधार म्हणून फारशी छाप पाडू शकला नाही.

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये हरली

अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे टीम 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची चर्चा निराधार आहे. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर तो बीसीसीआयसोबत बसून त्याचे कसोटी भवितव्य ठरवेल, अशी शक्यता आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माची आतापर्यंतची आकडेवारी

रोहित शर्माने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यात संघाने 4 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत, तर एक बरोबरीत सुटला आहे.

त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने 26 सामन्यांमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळली आहे, ज्यामध्ये भारताने 19 सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत.

याशिवाय त्याने एकूण 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 39 जिंकले आहेत आणि 12 सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube