- Home »
- Narendra Modi
Narendra Modi
विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar React On Budget 2024 : देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प (union budget 2024) आज केंद्र सरकारने (Central Goverment) सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून […]
अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज (दि.1) लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. याशिवाय प्राप्तिकर परताव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज सादर झालेल्या 58 मिनिटांच्या बजेटदरम्यान सीतारामन यांनी भारत, पॉलिसी, […]
Budget 2024 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधानांच्या देशवासीयांना शुभेच्छा!
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे असं सांगत, देशाला […]
Budget 2024 मध्ये महिलांसाठी मोठी घोषणा! 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज (दि.1 फेब्रुवारी) सादर करत आहेत. सादर करण्यात येणारं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यातच महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे 3 कोटी महिलांना […]
Video : राम मंदिराचा उल्लेख, जोरदार टाळ्यांचा कडकडाट अन् मूर्मूंना घ्यावा लागला भाषणात भलामोठ्ठा पॉज
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा […]
परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!
देशभरातील सरकारी परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. युवक-युवती वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. मात्र आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकार यंदाच्या अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी […]
देशाच्या संसदेतही घुमणार “मोदी-मोदी अन् जय श्रीराम”चे नारे; शिवसेना आणणार प्रस्ताव
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके […]
जन्मभूमीनंतर आता पुणे कर्मभूमी बनवायचीये; खासदारकीसाठी देवधरांची जोरात फिल्डिंग
पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या […]
INDIA आघाडीला बिहार अन् महाराष्ट्रात होत्या मोठ्या अपेक्षा… भाजपने दोन्हीकडचे राजकारण सेट केले!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच […]
ग्रामीण अर्थकारणावर आता थेट केंद्र सरकारचा ‘वॉच’ : 12 हजार सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण सुरु
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्रालयाने (Ministry of Cooperatives) देशातील 94 हजार सेवा सोसायट्यांपैकी (प्राथमिक कृषी पतसंस्था) 63 हजार सोसायट्यांच्या (Primary agricultural credit societies) संगणकीकरणाला सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्रातील 21 हजार सोसायट्यांपैकी 12 हजार सोसायट्यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या सेवा सोसायटींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, […]
