प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न कर, या शब्दांत मनोज जरांगे यांनी लाड यांचा समाचार घेतला असून यावेळी बोलताना जरांगेंची जीभ घसरलीयं.
फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय. ते जालन्यात शांतता रॅलीदरम्यान बोलत होते.
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या घोषणेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करीत टीका केलीयं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आमदार नितीन देशमुखांनी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी पोलिसांत झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.
विशाळगड अतिक्रमण तोडफोडनंतर सतेज पाटलांची भेट हे तर पुतना मावशीचं प्रेम असल्याची सडकून टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीयं.
आयएएस पूजा खेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेरील अतिक्रमणावर पुणे मनपाने कारवाई केलीयं. फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर मनपाने बुलडोझर चालवलायं.
विशाळगडावर यासीन भटकळ राहत होता, याबाबत चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. यासीन भटकळ विशाळगडावर राहत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.
मातंग समाजाचा स्तर उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर आण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था (आर्टी)च्या स्थापनेस सरकारने मान्यता दिलीयं.
भाजपचा पराभव अजितदादांमुळेच झाला असल्याचे टीकास्त्र आरएसएसच्या विवेक या साप्ताहिकामधून करण्यात आलं आहे. याआधीही RSS चे मुखपत्र ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती.