पाणी, नाणी, वाणी नासू नये, असा अभंग म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फटकेबाजी केलीयं. ते विधिमंडळात बोलत होते.
साखर पट्ट्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सात आमदारांवर मोदी सरकारची कृपा झालीयं. राष्ट्रीय सहकार विकास निगमने 1898 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलीयं.
1 जुलैपासून राज्यात दुधाला 30 रुपयांचा भाव आणि 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दुध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत झालेल्या रास्ता रोको आंदोलनात केलीयं.
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीयं.
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.