- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
जानकारांना सोबत घेणार, माढा सोडणार… पवार-ठाकरे साधणार पाच समीकरणे
महादेव जानकर (Mahadev Jankar) कोणासोबत जाणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. आपण माढा (Madha) आणि परभणी (Parbhani) या मतदारसंघांमधून लढणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. पण या दोन्ही जागा महायुतीत त्यांच्या वाट्याला येतील याची शक्यता जवळपासही नाही. कारण माढ्यात भाजपचा विद्यमान खासदार आहे, तर परभणीमध्ये शिवसेनेचे. तिथे राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. अशात जानकर […]
-
इंदापूर, दौंड अन् पुरंदरचे वाद… अजितदादांच्या मदतीला चंद्रकांतदादा सरसावले…
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. […]
-
Lok Sabha Election : भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला का वगळले?
मुंबई : जगातील सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गांधीनगरमधून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून […]
-
Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : नितीन गडकरींना पहिल्या यादीतून डच्चू
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (for the upcoming Lok […]
-
भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रामदासभाई एवढे का चिडले?
“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
18+18+9+3 – सूत्र ठरले, शिलेदारही हेरले… पहा महाविकास आघाडीची संभाव्य समीकरणे
आघाडी-युतीमध्ये निवडणूक लढवताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार? तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सृदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचे निवडून येण्याची क्षमता […]
-
पाच कारणे… लोकसभेला अमरावतीमध्ये नवनीत राणांचा गेम होणार!
नवनीत राणा आणि रवी राणा. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य. बायको खासदार आणि नवरा आमदार ते देखील अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणला. एका बुलेटवरुन फिरणारे हे दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो. ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा, कधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका तर कधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी […]
-
डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’; CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण नाकारले आहे. बारामती येथील कार्यक्रमानंतर दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत व्यस्ततेचा असल्याने यावेळी आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे शक्य होणार नाही, असे शिंदे-फडणवीस यांनी पत्र लिहून शरद पवार यांना कळविले […]
-
काय सांगता… हर्षवर्धन पाटलांना आणखी सुखाची झोप लागणार!
“इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. काही चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय” हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) भाजपामध्ये (BJP) का गेले? या प्रश्नाचे त्यांनी हे मिश्किलीत दिलेले उत्तर मागच्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कमालीचे चर्चेचे ठरले. पण त्यांचे हे विधान खरंच असल्याचे दिसून येते. भाजपने विरोधी पक्षात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागणार? राज्य सरकारकडून प्रभाग रचनेत पुन्हा बदल
मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व 28 महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काल (29 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाने (state government) मान्यता दिली होती. त्यानंतर आज (1 मार्च) विधिमंडळातही याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता आहे. (state […]










