Maratha Reservation : ‘सरकारने जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नये’; राऊतांनी सुनावलं

Maratha Reservation : ‘सरकारने जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नये’; राऊतांनी सुनावलं

Sanjay Raut on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknath Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करत सरकारलाही इशारा दिला. सरकारने जरांगे पाटलांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘विजयाचे श्रेय मराठा समाजाचे, सध्या आंदोलन स्थगित करतोय’ जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. मनोज जरांगे पाटील हा एक हट्टा माणूस लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच त्यातून मार्ग निघावा अशी सगळ्यांचीच भूमिका राहिली. सगेसोयरे, सरसकट, कुणबी दाखले हे सर्व सरकारने काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागतेय का हा येणारा काळच सांगेल. सरकारने आश्वासन दिले आहेत, अध्यादेश काढले आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे,असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube