आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा

आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र, मंत्री छगन भुजब (Chhagan Bhujbal), प्रा. लक्ष्मण हाकेंसह अन्य ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला. दरम्यान, आता मनोज जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता त्यांनी इशारा दिला.

Bhushi Dam: धबधब्यातून कुटुंबच गेले वाहून; तिघांचे मृतदेह सापडले, दोन जणांचा शोध 

विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला मनोज जरांगे उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, ओबीसींना आरक्षण देऊ नका, असं मराठ्यांनी कधीच म्हटलेले नाही. मात्र ओबीसींच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. आम्ही कधीही जातीवाद केला नाही. मराठ्यांनी मनावर घेतलं तर या राज्यात काहीही होऊ शकतं, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, असा इशारा जरांगेंनी नाव न घेता भुजबळांना दिला.

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ‘धर्मवीर-2’ चे पोस्टर लॉन्च, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा 

ते म्हणाले, मी कधीही जातीवाद केला नाही. माझ्या मराठ्यांच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून रस्त्यावर उतरलो. विनायक मेटे यांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. मराठवाड्यात1884 पासून आरक्षण दिले जात होते. ओबीसींच्या आधी मराठा समाजाला आरक्षण होते, हे ओबीसी नेते समजून घ्यायला तयार नाहीत. गावखेड्यात मराठा आणि ओबीसी गुण्यागोविंदाने राहतात. पण ओबीसी नेत्यांना हे नको आहे, असंही जरांगे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, 57 लाख कुणबी मराठा रेकॉर्ड मिळाल्यानंतरही ओबीसी नेते या नोंदी रद्द करा म्हणत आहेत, हा जातिवाद नाही का? आम्ही ओबीसींच्या ताटातून काहीही घेत नाही. आम्ही आमचे हक्काचे मागत आहोत. त्यांना आमची वेदना कळत नाही. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे, या मतावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी ठणकावलं.

भुजबळांवरही टीका…
यावेळी बोलतांना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. छगन भुजबळ यांनीच मातोरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितली. त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या. भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिलं. भुजबळच हे सर्व घडवून आणत आहेत, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज