काँग्रेस पक्ष का सोडतायत ? कुणाल पाटलांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले

Kunal Patil On Congress: काँग्रेसचे धुळ्यातील बडे नेते व माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कुणाल पाटील यांचे आजोबा, वडिल हे काँग्रेसमधील (Congress) मोठे नेते होते. पाटील घराणे हे तब्बल 75 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ होते. हेच कुणाल पाटील आता मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याचे अनेक कारणे कुणाल पाटील यांनी सांगितली. तरुण नेतृत्वाला वेळेवर संधी न दिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली आहे.
भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, एकंदर माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दहा वर्षांमध्ये भाजपने देशात विकास करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा विकास करत आहे. त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. जनतेला विकासाच्या प्रवाहात जायचे आहेत. त्यासाठी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतलाय. आम्ही 75 वर्षांमध्ये काँग्रेस होतो. पक्ष सोडणे अवघड आहे ते सोपे नाही. कारण ज्या पक्षाच्या विचाराशी जोडलेलो असतो. त्या पक्षाला सोडणे हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने त्रासदायक असते. परंतु काही गोष्टी व्यापकदृष्टीने विचार करून घेतल्या आहेत. सर्व बाबींचा विचार करून कटू निर्णय घ्यावे लागतात. सर्वांच्या फायद्याचे, हिताचे निर्णय घ्यावे लागतात. (Kunal Patil On Congress)
‘सैयारा’च्या ‘धुन’ गाणं विशेष, जेव्हा मी, मिथून आणि अरिजित एकत्र येतो तेव्हा…, मोहित सूरी असं का? म्हणाले
काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ सैनिक म्हणून काम केले. काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्र बालेकिल्ला होता. धुळे, नंदूरबार येथून काँग्रेसचा प्रचार सुरु व्हायचा. इंदिरा गांधी, सोनिया गांधी या प्रचार सभांसाठी येत होते. पण आता उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसच्या संघटनेचे दुर्लक्ष झाले आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले होते. तेव्हा अडीच वर्षांचा अनुशेष भरून निघेल, असे वाटत होते. तरुण नेतृत्वाला संधी मिळेल असे वाटत होते. परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप कुणाल पाटील यांनी केलाय.
भाजपला धक्का, आमदार टी.राजा यांनी दिला राजीनामा; कारण काय?
काँग्रेसची जनतेशी नाळ तुटली
काँग्रेस पक्ष हा पूर्वी जनतेशी कनेक्ट होता. परंतु आता काँग्रेसची जनतेशी नाळ तुटले आहे. त्याचा हा परिणाम दिसून येत आहे. मोदींच्या लाटेमध्ये मी निवडून आले होतो. राहुल गांधी यांच्या आदेशामुळे मी 2019 ला लोकसभा लढलो. पण पराभूत झालो. 2019 ला विधानसभा लढलो आणि निवडून आलो. काँग्रेसचा संपर्क सर्वसामान्यांशी होता. परंतु आता काँग्रेसचे नेते स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतायत. काँग्रेस पक्ष म्हणून संधी मिळत नसल्याची खंत कुणाल पाटील यांनी बोलून दाखविली.
काँग्रेस नेत्यांनी मनधरणी केली
काँग्रेसच्या काही नेतेमंडळीशी मी बोललो आहे. माझ्या अडचणी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले जाऊ नका, मार्ग काढू. मला चित्र स्पष्ट दिसतंय. त्त्यामुळे उद्या दुपारी भाजप कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहे.
कुणाल पाटलांची वडील बावीस वर्षे मंत्रिमंडळात
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे वडिल रोहिदास पाटील हे तब्बल बावीस वर्षे मंत्रिमंडळात होते. अनेक खातेही त्यांनी सांभाळले. ते तब्बल सात वेळा विधानसभेवर निवडून गेलेले होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते. तर कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामण आनंदा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक व माजी खासदार राहिलेले आहेत. या घराण्याचा धुळे जिल्ह्याचा राजकारणावर जबरदस्त पकड होती. तर कुणाल पाटील हे 2014, 2019 या सलग दोन टर्मला धुळे ग्रामीणमधून विजयी झाले. पण या विधानसभेला भाजपचे नवखे उमेदवार राघवेंद्र भदाणे यांनी कुणाल पाटील यांना पराभव केले होते. पाटील यांच्या धुळ्यात शिक्षणसंस्था, मेडिकल कॉलेज आहे.