दमदाटी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाणार; विखेंचा लंकेंना इशारा

दमदाटी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाणार; विखेंचा लंकेंना इशारा

श्रीगोंदा – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha elections)आयोजित केलेल्या महायुतीच्या (Mahayuti) प्रचारसभेच्या सांगता सभेत भर पावसात खा. डॉ. सुजय विखेंनी (Dr. Sujay Vikhe) तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.

क्रिकेट लीजेंड जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती, ‘या’ संघाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना 

शनिवारी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथील शनी चौकात सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संबोधित करणार होते. या सभेला हजारोंच्या संख्येने लोक जमले असतानाही अचानक आलेल्या पावसामुळे सभा आटोपती घ्यावी लागली, असं असतानाही सुजय विखेंनी भर पावसात लोकांशी संवाद साधला.

मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींची टीका! म्हणाले, ‘हे’ देशाला घाबरवतात 

डॉ.विखे पाटील यांनी मागील ४५ दिवस भर उन्हात निष्ठेने प्रचार केला म्हणून सर्वांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी विरोधी उमेदवारांनी मागील ४५ दिवसात केलेल्या खोटारड्या प्रचाराचा समाचार घेतला. लोकांना शिव्या देणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिसांचा बाप काढणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, समाज माध्यमांवरून खोटेनाटे व्हिडिओ टाकून अफवा पसरविणे अशा सगळ्याच गोष्टीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

त्यांनी लोकांना आश्वस्त केले की, येणाऱ्या काळात अशा सर्व समाज विघातक प्रवृत्तींना चांगला धडा शिकवला जाईल. ते म्‍हणाले की, ०४ जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास हेच आपले एकमेव ध्येय राहणार आहे.

नगर मधील विविध प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करायची आहे. माझ्याकडे अद्वितीय अहिल्यानगरचे व्हिजन असून तुम्हाला गर्व वाटेल असा, विकास मी करणार असल्याचे त्यांनी सांगितेले. त्यामुळं मतदान करताना देशाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहून मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलं.

कुणीही घाबरण्याचे कारण नाही, कारण महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जर कोणी दमदाटी, गुंडशाही, दडपशाही करत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचं ते म्हणाले. मागील 45 दिवसांत विखेंनी कुणावरही टीका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्या  विकासकामांच्या जोरावर मते मागितली. पण, सांगता सभेत त्यांनी घेतलेली आक्रमक ही कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube