अहमदनगरमध्ये जिल्हाध्यक्षांचाच काँग्रेसला मोठा धक्का; नागवडे दाम्पत्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

अहमदनगरमध्ये जिल्हाध्यक्षांचाच काँग्रेसला मोठा धक्का; नागवडे दाम्पत्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

अहमदनगर : जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawade) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम राम ठोकला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनीही महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. (Rajendra Nagwade has resigned from the post of district president and has given a big blow to the Congress.)

येत्या काही दिवसांतच नागवडे दाम्पत्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, राजकारणात गॉडफादर हवा असतो. अजित पवार यांनी पाठबळ देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या पाठबळावरच आपण ही भूमिका घेतली आहे. येत्या 20 फेब्रुवारीला हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘बंगाल-बिहार ते महाराष्ट्र’, ‘इंडिया’च्या मजबूत किल्ल्यांना हादरे; लोकसभेचं गणित बिघडणार?

मागील काही महिन्यांपासून अनुराधा नागवडे या विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे इच्छाही व्यक्त केली होती. मात्र श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. पण काहीही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार नागवडे यांनी केला होता.

त्यामुळेच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग निवडला असल्याचे बोलले जात आहे. मात्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. भाजपचे बबनराव पाचपुते तिथून आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतूनही उमेदवारी मिळो अथवा नाही मिळो पण आपण निवडणूक लढवणारच असे नागवडे यांनी जाहीर केले आहे.

Jayant Patil : “नगरसाठी उमेदवार देणार, निवडूनही येणार”; जयंत पाटलांची राऊतांवर ‘कडी’

आगामी राजकीय वाटचाली बाबतची दिशा ठरवण्यासाठी राजेंद्र नागवडे यांनी नुकतीच श्रीगोंद्यामध्ये समर्थकांची एक बैठक घेतली होती. यात आपण राष्ट्रवादी प्रवेशाबाबत समर्थकांकडून मत जाणून घेण्यात आले. तसेच गेल्या दोन निवडणुकांमध्ये इतरांना मदत करत त्यांना आमदार होण्यास मदत केली. मात्र आता जनतेच्या प्रश्नासाठी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी अनुराधा नागवडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नागवडे पती-पत्नींनी आपले राजीनामे काँग्रेस श्रेष्ठींकडे सुपूर्त केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube