Weather Update : उन्हाळ्यात अवकाळी अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Weather Update : उन्हाळ्यात अवकाळी अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. अनेक भागात (Weather Update) कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दिवसांत शक्यतो पाऊस होत (Rain Alert) नाही. परंतु, बदललेल्या हवामानाचा फटका बसू लागला आहे. राज्यातील प्रमुख शहरांत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 35 ते 37 अंशांदरम्यान पोहोचला आहे. तर दुसरीकडे विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना (Nagpur Rain) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात 17 आणि 19 मार्च रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. ऐन उन्हाळ्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Weather Update : सावधान! पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

याआधी शनिवारी पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दुपारच्या वेळेस वातावरणात बदल झाला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यानंतर 19 तारखेपर्यंत विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील चार दिवसात केरळ, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहिल. मध्य भारतात अनेक ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Weather Update : पुढील पाच दिवस पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी

या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे. आणखीही काही दिवस पावसाची शक्यता असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.  हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube