Weather Update : सावधान! पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update : सावधान! पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

IMD Weather Update in Maharashtra : मागील चार ते पाच दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रासह (Weather Update) अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल असा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा (Rain Alert) इशारा दिला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Update : सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी; ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भ आणि मराठवाड्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुण्यात ढगाळ हवामान राहिल. पाऊसही होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत गारपीटीसह पावसाची शक्यता आहे. धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.  हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी

या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे. आणखीही काही दिवस पावसाची शक्यता असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज