“ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम”, पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य; “त्यांचा मेंदू भ्रष्ट झाला”, भाजपाचाही पलटवार

“ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम”, पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य; “त्यांचा मेंदू भ्रष्ट झाला”, भाजपाचाही पलटवार

Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) पाकिस्तानला चोख उत्तर दिले होते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कारवाईस पाठिंबा दिला होता. परंतु, आता मात्र काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी ऑपरेशन सिंदूरवर खोचक टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही (Chandrashekhar Bawankule) तिखट प्रत्युत्तर दिले. नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

नाना पटोले यांच्या टीकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ‘काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. या (Congress Party) देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. या मानसिकतेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे प्रत्युत्तर मंत्री बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून दिले. बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

विदर्भात काँग्रेसला धक्का! अकोल्यातील ‘हा’ बडा नेता आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत होणार दाखल

बावनकुळेंची पोस्ट काय ?

ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम आहे असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रुंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही.

नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात.

सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे आणि कोण पाकिस्तानच्या!
नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.

सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube