गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? सपकाळांचा सवाल

गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? सपकाळांचा सवाल

Hindi Language Controversy : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती (Hindi Language Controversy) करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने (Congress Party) घेतलेली आहे. आठव्या सुचीतील सर्व भाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshavardhan Sapkal) दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व संस्था आपापल्या पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्यावतीने मी साहित्यिकांना पत्र लिहून आवाहनही केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा हीच सर्वांची दिशा आहे. हा संस्कृतीचा लढा आहे त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन लढले पाहिजे कोणाचा फोन वा निमंत्रण आले का हा प्रश्न महत्वाचा नाही. आम्ही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात लढत आहोत असेही सपकाळ म्हणाले.

“पहिली ते तिसरीपर्यंत..” शिक्षणमंत्र्यांचं हिंदीबाबत मोठं वक्तव्य, दादा भुसेंनी काय सांगितलं?

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक निती व महाराष्ट्र दुसरी निती कशी हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. तसेच गोळवलकर यांच्या बंच ऑफ थॉट बद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मनसेच्या मोर्चाच्या तारखेत बदल

हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन मोर्चा (Hindi Language) काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी (MNS) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

राजकीय खलबतांनंतर तारखेत बदल?

एकीकडे आज (दि.26) सकाळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्य काही तासातच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाची तारीख फक्त बदलण्यात आली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ तीच असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, राजकीय खलबतांनंतर राज ठाकरेंनी यू-टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी, मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा पुन्हा वार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube