“देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही..”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

प्रशांत गोडसे, मुंबई
Uddhav Thackeray : त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलं, बाप चोरला तरीही हा पक्ष काही संपत नाही. कारण पैसे फेकून आम्ही माणसं जमवली नाहीत तर सगळे कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळेच शिवसेना तरलेली आहे. देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली. शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, केंद्रात सरकार आल्यापासून पणवतीच लागली आहे. मंदिराचं छत गळतंय. विमान अपघात झाला. रेल्वे अपघात झाला याची कुणीच जबाबदारी घेत नाही. मेट्रोत पाणी भरलं. आज खरंतर देशाला पंतप्रधानांची गरज आहे. पण इकडे तर भाजपला पंतप्रधान आहे. देशाला नाही. तसंच देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहाची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांची गरज आहे. गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंहांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षणमंत्र आहात की गुंडांचे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात का पक्षाचे घरफोडे मंत्री आहात अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
जे आपले बाप बदलतात, ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आता टीका करत आहेत. भाजप पक्ष असाच आहे. आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी आणखी वेगळा शब्द वापरला असता. आपल्या वर्धापनदिनावर आता भाजपनं पाळलेली बेडकं (एकनाथ शिंदे गट) डरावं डरावं करतील. पाळीव बेडकं समोर येत आहेत. या चोरांना खरच मी म्हणेल लाज लज्जा शरम काही ठेवली नाही.
मुंबईत मोठी घडामोड! तीन माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; हाती घेतला धनुष्यबाण
निवडणूक जिंकण्यासाठी माती भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाहीत. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळील. अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा वादा झालाच नव्हता असे म्हणता मग माता भगिनींना केलेला वादा खरा होता की नव्हता असा सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप नेत्यांना केला.
तुझा जीव किती, उंची किती, बोलतो किती?
यानंतर ठाकरेंनी मंत्री नितेश राणे यांच्यावर बोचरी टीका केली. उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंवर (Nitesh Rane) टीका केली.
ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल