ऊस विदेशातला पण साखर भारतातलीच.. जाणून घ्या, शेतीतल्या ‘नगदी’ पिकाचा इतिहास

Sugarcane History : भारतात आजमितीस साखरेच प्रचंड उत्पादन घेतलं जात. साखर ऊसापासून (Sugarcane History) तयार केली जात. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात यांसह अन्य काही राज्यांत उसाचे उत्पादन जास्त आहे. त्यामुळे आज भारत जगातील आघाडीच्या साखर उत्पादक देशांत गणला जातो. ऊस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. तुम्ही उसाला भारतातलच पीक मनात असाल पण हा तुमचा समाज चुकीचा आहे.
ऊस भारतासाठी एक विदेशातील पीक आहे. राजधानी दिल्लीपासून तब्बल आठ हजार किलोमीटर दूर न्यू गिनी बेटांवर सर्वात आधी उसाची लागवड झाली होती. इतिहासकारांवर विश्वास ठेवला तर या बेटांशी ऊसाच्या शेतीचा संबंध तब्बल आठ हजार वर्षे जुना आहे. कालांतराने येथूनच ऊस जगभरात पोहोचला. असे मानले जाते की न्यू गिनीपासून दोन हजार किलोमीटर दूर अंतरावरील सॉलोमन बेट समूहात पहिल्यांदा ऊसाच्या शेतीचा प्रसार झाला. यानंतर आणखी दोन हजार वर्षांनी इंडोनेशिया आणि उत्तर भारतापर्यंत ऊस पोहोचला. इतिहासकारांच्या मते भारतात तीन हजार ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारतात ऊसाची शेती सुरू झाली होती.
कधीकाळी साखर आयात करत होता भारत
आजमितीस भारत जगातील दुसरा सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे. जर भारताने साखर निर्यात काही काळ थांबवली किंवा बंद केली तर जगातील अनेक देश संकटात सापडू शकतात. कारण या देशांना साखर आयात करण्याशिवाय पर्याय नाही. पण 100 वर्षांपूर्वी परिस्थिती एकदम वेगळी होती. 1900 च्या दशकात भारत जावा आणि पूर्वेकडील देशांकडून साखर आयात करत होता. या काळात ऊसाचे उत्पादन चांगले होत होते मात्र ऊस लागवडीच्या सुविधा कमी होत्या.
‘रेशीम शेती’चा जिल्ह्यात वाढतोय ट्रेंड, एकाच वर्षात 151 मेट्रीक टन उत्पादन; जाणून घ्या फायदाच होईल..
भारतमार्गे ऊस चीनमध्ये पोहोचला
थोड आणखी इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं की साधारण 2800 वर्षांपूर्वी ऊस भारत मार्गे चीनमध्ये पोहोचला होता. इतकेच नाही तर ऊसापासून साखर कशी तयार करायची याचे तंत्र सुद्धा चिनी प्रवाशांनी भारतातूनच चीनमध्ये नेले होते.
साखर कधीपासून तयार होऊ लागली
आपल्या रोजच्या खाद्यपदार्थात साखर हा एक महत्वाचा घटक आहे. चहा भारतीयांचं आवडतं पेय आहे. प्रत्येक घरात सकाळची सुरुवात चहाच्या घोटानेच होते. या चहात साखर असतेच. लोक मोठ्या आनंदाने साखरेचा गोड चहा घेतात. पण आपल्यातील बहुतेक लोकांना माहिती नाही की साखर नेमकी कधीपासून तयार होऊ लागली. इतिहासात पाहिलं तर ऊसापासून साखर तयार करण्याची सुरुवात सर्वात आधी 2374 वर्षांपूर्वी भारतातच झाली होती. गुप्त राजवटीच्या काळात भारतात साखर तयार होऊ लागली असे सांगितले जाते.
पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला
आतापर्यंत ऊस आणि साखरेचा इतिहास आशियाई देशांभोवती फिरताना आपण पाहिले. पण ऊस आणि साखरेच्या या प्रवासात अमेरिकेचही नाव येतं. एका स्पॅनिश व्यक्तीने सन 1535 मध्ये उत्तर अमेरिकेत जगातील पहिला साखर कारखाना (Sugar Factory) सुरू केला. यानंतर हळूहळू अमेरिकेत साखर उत्पादन हा एक मोठा उद्योग म्हणून नावारूपाला आला.
अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी
आधी साखर कशी तयार व्हायची
आताच्या घडीला साखर कारखान्यांत साखर तयार होते. मोठ्या मशिनरीच्या मदतीने अगदी कमी वेळात साखर तयार होते. पण आधीच्या काळात अशी सुविधा नव्हती. त्यावेळी अगदी वेगळ्या पद्धतीने साखर तयार केली जात होती. सर्वात आधी एक बॉक्सच्या आकाराच्या विटा किंवा दगडांच्या मदतीने भट्टी तयार केली जात होती. भट्टीच्या वरच्या बाजूने तांब्यापासून तयार केलेल्या सात किटली ठेवल्या जात होत्या.
या किटलींचा आकार वेगवेगळा असायचा. किटलीच्या खालच्या बाजूने राख काढण्यासाठी थोडी जागा ठेवली जायची. उसाचा गरम रस सर्वात वरच्या किटलीमध्ये असायचा. नंतर हा रस दुसऱ्या किटल्यांमध्ये टाकला जायचा. शेवटच्या किटलीमध्ये येईपर्यंत ऊसाचा रस सिरपमध्ये रुपांतरित झालेला असायचा. यानंतर सिरप थंड होऊन गुळात रुपांतरित व्हायचा. याच तुकड्यांतून नंतर प्रक्रिया करून साखर तयार केली जात होती.