समित कदम फडणवीसांचाच माणूस! उद्धव अन् आदित्य ठाकरेंसोबत अजितदादा, पार्थही होते रडारवर

समित कदम फडणवीसांचाच माणूस! उद्धव अन् आदित्य ठाकरेंसोबत अजितदादा, पार्थही होते रडारवर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी माझ्याकडे पाठवण्यात आलेली समित कदम (Samit Kadam) नावाची व्यक्ती ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जवळची आहे. त्यामुळेच त्याला कोणतेही पद नसताना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे, असे म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भर पत्रकार परिषदेतच फोटो दाखवत आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. (Anil Deshmukh Criticize Devendra Fadanvis on Samit Kadam)

यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, समित कदम नावाच्या व्यक्तीला मी कधीही ओळखत नव्हतो. त्याला मी पाहिलेलेही नव्हते. तो पहिल्यांदा जेव्हा माझ्या घरी आला तेव्हा त्याने एक पाकीट आणले होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे त्याचबरोबर अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर देखील आरोप लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. फडणवीस हे केवळ राजकीय नेत्यांवरच नाही. तर त्यांच्या मुलांना देखील विविध आरोपांमध्ये अडकवण्याचं गलिच्छ राजकारण करत आहेत.

Video: खारघरमध्ये फिल्मी स्टाईल दरोडा; ज्वेलर्सचं दुकान लुटलं अन् हवेत गोळीबार करत पळून गेले

देवेंद्र फडणवीस आणि सुमित कदम यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याचे काही फोटो देखील माझ्याकडे आहेत. समितच्या पत्नीने फडणवीसांना राखी बांधत असल्याचाही फोटो आहे. यावरून लक्षात येते की, त्यांचे संबंध किती जवळचे आहेत. त्याचबरोबर या व्यक्तीला कोणतेही पद नाही. तो कोणताही कार्यकर्ता नाही. तरी देखील त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ती कशासाठी? असा सवाल देखील यावेळी अनिल देशमुख यांनी विचारला.

नेमकं प्रकरण काय आहे?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव टाकण्यात आला होता. असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला होता. त्यावर देशमुखांनी पत्रकार परिषदा घेत आपल्या आरोपांर ठाम असल्याचं दाखवून दिलं.

त्याचबरोबर देशमुख मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांनी देखील देशमुखांना आव्हान दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरती शंभर कोटींच्या वसुलींचे आरोप लागले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होतं. आज पर्यंत मी बोललो नाही. कारण माझा एक सिद्धांत आहे. मी कुणाच्याही नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर मी त्याला सोडत नाही. तर अनिल देशमुख यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला आणून दिले होते. ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवार, आज माझ्यावर जे आरोप केले त्याबाबत तसेच वाझेंवर यांच्याबाबत काय बोलत आहेत? हे सर्व रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे जर कोणी रोज खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक करे कारण देवेंद्र फडणवीस कधीच पुरावे शिवाय बोलत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube