“ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलंच, त्यांच्या मोर्चात काँग्रेसनं..”, पृथ्वीराज चव्हाणांनी नेमकं काय सांगितलं?

Prithviraj Chavan on Hindi Language Controversy : राज्यात हिंदी भाषेचा विरोध सातत्याने वाढू (Hindi Language) लागला आहे. राज्य सरकार इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा (Hindi Language Controversy) म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. मनसेने 5 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरेही 7 जुलै (Uddhav Thackeray) मराठी भाषा समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या घडामोडींनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan) सूचक वक्तव्य केलं आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोर्चात सहभागी व्हायचं की नाही हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील असे चव्हाण म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी भाषेच्या (Hindi Language) मुद्द्यावर राज्यात जो वाद सुरू आहे त्यावर भाष्य केले. चव्हाण पुढे म्हणाले, हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेतील. राज्य आणि केंद्र सरकारने शैक्षणिक धोरणावर निधी कमी केला आहे त्यामुळे शिकवण्यासाठी साधन सामग्री नाही. शिक्षकही नाहीत. मूलभूत शैक्षणिक गरजांवर खर्च करायला हवा.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत उभी फूट; दादांचा आमदार ठाकरेंच्या मोर्चात लावणार हजेरी
मराठी आपली मातृभाषा आहे तर हिंदी राज्यभाषा आहे. इंग्रजी ज्ञानभाषा आहे. आता एक देश एक भाषा करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. त्यामुळेच हा गोंधळ सुरू आहे. काही काळानंतर हिंदी ही एकच भाषा देशभरात ठेवण्याचा घाट केंद्र सरकारचा आहे, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
हिंदी भाषा सक्तीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला शरद पवार गटाने (Sharad Pawar NCP) पाठिंबा दिला आहे. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. आता ठाकरे बंधू मोर्चामुळे एकत्र येत आहेत असे नाही. अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दोघे एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा एक घटक आहेत. कुणासोबत युती करायची हा त्यांचा प्रश्न आहे.
शक्तीपीठ महामार्ग फक्त कमिशनखोरीसाठी
राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी 20 लाख कोटींचं कर्ज डोक्यावर घेत आहात ते कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी. वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री असेल तरी हा प्रकल्प रेटून केला जाईल. सगळं काही कमिशनखोरीसाठी आहे. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत जे झालं तेच इथं करायचं आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे आता असाच भ्रष्टाचार शक्तीपीठ महामार्गावरून करायचा आहे असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
अविनाश भोसलेंची सीबीआयच्या डोळ्यात धूळफेक ! अटकेत असताना चौदाशे कोटींचे हॉटेल विकले कसे ?