शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार

शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार

Amol Mitkari : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. आज (24 मार्च) त्यांनी बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता 

शिवतारे यांच्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले, विजय शिवतारे हा पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारेंची फडफड ही विझत असलेल्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून ते सध्या 5 -50 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे इतरांचा मेंदू आहे. त्याचा तपास आम्हाल करावा लागले. थोड्या पैशांसाठी बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि कोणत्यातरी पक्षाकडून 5-25 लाख घ्यायचे, यासाठी त्यांची धडपड सरू आहे, असंही मिटकरी म्हणाले.

वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ इम्रान हाश्मीच्या सिनेमॅटिक प्रवासाची गोष्ट! 

पुढं बोलतांना मिटकरी म्हणाले, शिवतारे बालिश विधानं करत आहे. त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. त्यांच्या बैठकीला कोणीही किंमत दिलेली नाही. तुकाराम महाराजांचा शिवतारेंवर अभंग आहे. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नागीमध्ये विष असतं. तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे आहे. तुमच्या भागातील मतदार मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत, असंही मिटकरी यांनी सांगितलं.

मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त आहे, त्याच्या शिवाय हे बोलू शकत नाहीत. कदाचित ती व्यक्ती सत्तेतील असू शकते किंवा सत्तेत्या बाहेरही असू शकते. शिवतारेंनी अजितदादांवर बोलावं एवढी त्यांची औकात नाही. पण, आज त्यांनी पातळी सोडून अकलेचे तारे तोडले, अशी टीका मिटकरींनी केली.

अमोल मिटकरी यांच्यानंतर अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनीही शिवतारेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. विजय शिवतारे हा मनोरुग्ण आहेत. त्यामुळे सरकारने आता शिवतारे यांना पोलिस संरक्षणाबरोबरच डॉक्टरही द्यावा कारण मानसिक आजारी व्यक्ती समाजासाठी घातक असतो, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

अजित पवार यांनी कायम दादागिरीच केली. ते राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांनी आणि शरद पवारांनी ग्रामीण भागात दहशतवाद वाढवला. ही मानसिकता आणि प्रवृत्ती संपवण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असं शिवतारे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube