अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनाने सक्षम भूमिका घ्यावी; आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे भुमिका घ्यावी, अशी मागणी करत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी दिले.
‘गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन’, पंतप्रधान मोदींनी साधला राहुल गांधींवर निशाणा
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आज अहिल्यानगरमधील जिल्हाकार्यालयात आम्ही अनेक मान्यवर आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या नामांतरणाचे निर्णय घेण्यात आलेत. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार (Ahilyanagar name change petition) होता. काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते आपल्यामागे लपतात. त्यांच्या नांग्या ठेचायच्या आहेत, याचं उदाहरणं म्हणजे मागे दाखल झालेली जनहित याचिका आहे. हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगावं आम्ही हिंदू आहोत, आम्ही त्यांच्यादेखील घराबाहेर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, असा इशाराच आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय.
अहिल्यानगर नामांतराचा सकल हिंदू समाजाने स्विकार केला आहे. मात्र, नामांतर विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने नाशिक आणि अहिल्यानगर महानगर पालिकेला आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देष दिले आहे. या जनहित याचिकेतील अक्षेपाना जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे प्रतिउत्तर देणे अवश्यक आहे. स्थानिक जनतेची भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभुमी लक्षात घेवुन प्रशासनाने जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर कायम राहावे, यासाठी न्यायालयात सकारात्मक भुमिका घ्यावी, असे निवेदनात नमुद केले आहे.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वधुवर सुचक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, माजी नगरसेवक काका शेळके, निशांत दातीर, इंजि.राजेंद्र पाचे, ऋषि ढवन, प्रथमेश तागड, संतोष गावडे, सचिन चितळकर, बाळासाहेब शिपनकर, महादेव ढाकणे, राहूल आडसूळे, तुषार यादव, विलास मोडवे, वैभव वाघ, विजय शिपनकर, संतोष तागड, रविंद्र गावडे, मयुर ढगे, संग्राम शेळके, अर्थव औटी, रवि राऊत, प्रविण पवार, कृष्णा टपले आदी मान्यवर उपस्थित होते.