भाजपकडून निव्वळ अफवा, कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांना ठाम विश्वास

  • Written By: Published:
भाजपकडून निव्वळ अफवा, कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांना ठाम विश्वास

Prithviraj Chavan On Ashok Chavan : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसमधील आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं विधान केलं. या सर्व घडामोडीवर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हा (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं.

‘मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही’; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल 

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काल अशोक चव्हाण यांनी आमचे महाराष्ट्र प्रभारी यांच्याशी लोकसभेच्या रणनीतीबाबत चर्चा केली. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीवर त्यांच्यात चर्चा झाली. दुपारी ४-५ वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला माहित नव्हतं. ते अचानक काँग्रेसचा राजीनामा देतील, असं वाटलं नाही. कारण, जागावाटपाबाबत त्यांची महत्वाची भूमिका होती. मविआत त्यांना महत्वाचं स्थान होत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपमध्ये सर्व भाडोत्री, काही दिवसांनी त्यांचा अध्यक्षही कॉंग्रेसमधून आलेला असेल; ठाकरेंचे टीकास्त्र 

कॉंग्रेसचे आणखी काही आमदार चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये येणार असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. एकही आमदार त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाही. भाजपकडून निव्वळ अफवा उडवल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये. अशोक चव्हाण यांचा निर्णय हा दुर्दैवी निर्णय आहे. त्यांच्यावर कोणता दबाव होता, त्यांना असा निर्णय का घेतला हे अशोकराव सांगतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पुढं बोलतांना ते म्हणाले की, हे सगळं कशामुळं घडतं, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. भाजपवाल्यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये फूट करून संधी मिळतेय का, असा त्यांचा प्रयत्न असतो. जनतेचा पाठिंबा मिळत नसेल तर विपक्ष तोडा आणि सत्ता मिळवा, ही भाजपची रणनीती आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज