महायुती मुंबईत सर्वच जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

महायुती मुंबईत सर्वच जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

CM Eknath Shinde Interview : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपलीच शिवसेना खरी असा वारंवार दावा करत असतात. आता त्यांनी महायुती मुंबईतील सर्व जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांचा पाठिंबा आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे. तसंच, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत.

 

सर्व जागा जिंकणार

मुंबईत आम्ही कामं केली आहेत. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे. कारण अनेक काम आम्ही केले आहेत असा दावा करत मुंबईत आम्ही लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या 25 ते 30 वर्षात जी काम झाली नाहीत ती कामं आम्ही केली आहेत. त्यामुळे मुंबईतील जागा जिंकण्याचा विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत.

 

उद्धव ठाकरेंवर आरोप

आनंद दिघे यांनाही अनेक प्रकारचा त्रास देण्यात आला असा आरोप शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच गुरू शिष्याचं नात होत. परंतु, मी 24 तासच सोबत असल्याने कुणी त्यांना त्रास दिला, कोण त्यांच्यासोबत कसं वागलं हे मला माहित आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले. त्याचबरबोबर दिघे यांना जिल्हा बदलून दुसरीकडे पाठवण्याचेही प्रयत्न झाले असंही ते म्हणाले.

 

राज ठाकरेंचं कौतूक

राज ठाकरे हे काम करणारे होते. माझही कायम काम सुरू होतं. त्यामुळे आनंद दिघे अनेकदा राज ठाकरे यांच्याविषयी बोलायचे. राज यांचं कौतूक करत होते. त्यामुळे यांना त्रास होत होता असा आरोप उद्धव ठाकरेंवर शिंदे यांनी केला. त्यांची एवढी लोकप्रियता होती. सभा, भाषण न देता एवढी लोकप्रियता मिळवणं सोपं काम नव्हतं. याबद्दल त्यांना मत्सर होता. नेतृत्त्वावर विश्वास स्वत:चा नसला की या सगळ्या गोष्टी घडतात असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर आघात केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज