अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय.
महाराष्ट्र राज्यातील 13 कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत.
नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही- देवेंद्र फडणवीस
एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला विरोधच हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा वाऱ्याने उन्मळून पडला.