Ahmedanagar News : यंदा जिल्ह्यात पावसाने अक्षरश पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोपरगाव येथील मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे […]
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली असून यंदा भारत विश्वविजेता होईल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात धुसमटत आहे, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ खेळणार आहे, त्यामुळे रोहित सेना 2011 ची पुनरावृत्ती करु शकतो का? असा सवाल माजी क्रिकेपट्टू युवराज सिंगने केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना माजी क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवागने भारतीय […]
Kolhapur News : कोल्हापुरातील महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरले आहेत. यासंदर्भात साखर कारखाना सहसंचालकांनी गुरुवारी निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या साखर कारखाना निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारल्यानंतर मतदार यादीत 1272 सभासद अपात्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. अखेर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरले […]
Maratha Reservation : राज्यात गाजलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मराठवाड्यातल्या मराठा तरुणांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणीनूसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी समिती गठित केली. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, आता ही समितीची कार्यपद्धती नेमकी कशी असणार? कुणबी दाखले मिळण्यासाठी तरुणांना काय करावं […]
Maratha Reservation : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर समिती गठीत करुन अध्यादेशही काढला तरीही बीडमध्ये आंदोलनाची धग अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील गेवराईमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख […]
अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमदरण उपोषणापुढे सरकार नमलं असल्याचं दिसून येत आहे, राज्य सरकारच्यावतीने मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना कुणबी असल्याचे दाखले देण्यासंदर्भातील अध्यादेश घेऊन माजीमंत्री अर्जुन खोतकर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असून राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आलं आहे, जरांगे यांनीही हे निमंत्रण […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरसक्षणाच्या मुद्द्यावरून मोठे वातावरण तापले आहे. जालना येथे यासाठी आजही उपोषण सुरु आहे. हा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी […]
Cm Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन राज्यातील मराठा आंदोलकांमधून सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्राच आंदोलकांनी घेतला असल्याने दुसरकीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं कोडं सरकार कसं सोडवणार? हा पेच […]
Pune News : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात पुण्यातल मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे […]
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत, सरकारने जरांगेंची मागणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या सवलती मिळणार आहेत, त्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी ही […]