- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Rajarshi Shahu Maharaj Scholarship : अभिमत विद्यापीठात शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू…
मुंबई : अभिमत विद्यापीठांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती) लागू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता प्रत्यक्षात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठ संलग्नित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू आहे. […]
-
…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी
पालघर : पालघरमधील जव्हार पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेतच आमदार सुनिल भुसारा अधिकाऱ्यांवर भडकल्याने गोंधळ झाला आहे. जव्हार पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार भुसारा यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आमसभेत कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनिल भुसारा चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. आमदार भुसारा यांचा अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ सध्या […]
-
Chandrkant khaire : मंत्री अमित शहांवर ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा गंभीर आरोप
औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक […]
-
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला…
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून याआधी असा महाराष्ट्र कधी नव्हता. कुठला आमदार कुठल्या पक्षात काहीच कळत नाही. पूर्वी आमने-सामने या गोष्टी होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलंय. राज […]
-
Aaditya Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांची दिशाभूल…
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यप्रणालीबद्दल हरकत घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी सरकारकडून राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणाने झाली. यावेळी रमेश बैस यांनी 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा […]
-
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही सोडेना…
मुंबई : गद्दार गद्दारी करण्यासाठी कारणं देत असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र होतं, असा आरोप […]
-
Budget Session : महिला आमदाराच्या हातात तान्ह बाळ अन् डोळ्यात पाणी…
मुंबई : हिवाळी अधिवेशनात आपल्या बाळाला घेऊन आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार सरोज अहिरे यांची चर्चा सुरु आहे. हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत सरोज यांनी सुविधायुक्त कक्षाची मागणी केलीय. सुविधायुक्त कक्ष न मिळाल्याचं अधिवेशन सोडून जाणार असल्याचं आमदार सरोज अहिर यांनी ठणकावून सांगितलं आहे. Italy […]
-
हे तर शेतकरी विरोधी सरकार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोलेंचा घणाघात
मुंबई : नवनिर्वचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसदर्भात राज्यात सध्या अनेक प्रश्न उपस्थित असताना राज्यपाल रमेश बैस आपल्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देणार असल्याचं वाटलं, पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा घणागात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अधिवेशनाच्या अद्याप सुरुवातही झाली नाही, त्याआधीच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यासाठी […]
-
हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचं ते यालाच…
कोल्हापुरातील कणेरी मठातल्या 52 गाईंचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला तर आणखी पन्नासेक गाई गंभीर आहेत. कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असून लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. त्यानंतर गाईंचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं उघड झालंय. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून गाईंना श्रद्धांजली वाहत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधून टीका करण्यात आलीय. अग्रलेखात म्हटलं, “कणेरी […]
-
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार, एकनाथ खडसेंनी थोपटले दंड
जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. […]









