- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
हद्दच झाली राव! सोलापुरात ‘गौतमी पाटील थाळी’ सुरू
सोलापूर : काही दिवसांपासून चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावानं आता थाळी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. होय खरंय, सोलापुरातील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या एका चाहत्याने आपल्या हॉटेलमध्ये गौतमी पाटील थाळी सुरु केलीय. टेंभुर्णीमध्ये हॉटेल सुमनमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे. या थाळीची विशेषत: म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या हस्तेच हॉटेल […]
-
छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक का म्हणतात? छगन भुजबळांचा सवाल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते आज पुण्यातून बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात घमासान सुरु झालंय. विरोधकांकडून राज्यभरात आंदोलन करीत अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी […]
-
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक? शरद पवारांनी सांगितलं
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी वावगं ठरणार नसून ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी म्हणावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच असं विधान केलं होतं, त्यावरून राज्यात विरोधकांकडून आंदोलने सुरु आहेत. त्यानंतर आता शरद पवार […]
-
आमदार लक्ष्मण जगताप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिलीय. तडफदार नेतृत्व काळाने हिरावले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला, असं म्हंटलंय. तसेच आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास […]
-
अरे देवा! शंभर रुपये दिले नाही म्हणून विद्यार्थ्याचा हात कापला…
पुणे : शंभर रुपये दिले नाही म्हणून एका विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पाषाण परिसरात घडलीय. 31 डिसेंबरच्या रात्री एका हॉटेलमध्ये दोघे मित्र जेवणासाठी गेले असताना फुटपाथवर ही घटना घडलीय. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो अहमदनगरमधील […]
-
राणेंनी भावाला जाळून मारलंय, विनायक राऊतांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
सिंधुदुर्ग : स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं, त्यानंतर भावाला जाळून मारुन टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला आहे. राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते सिंधुदुर्गमधील कणकवलीत एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारकीर्दीत अनेकांचा बळी गेला आहे. […]
-
सालगड्याचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी, तानाजी सांवतांकडून कौतुक
धाराशिव : धाराशिवमधील परंडा तालुका म्हणजे कमी पावसाचा भाग. अशातच अर्थिक परिस्थिती जेमतेम तरीही संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्राद्वारे कौतुक केलंय. सावंत पत्रात म्हंटले, धाराशिवमधील परंडा तालुक्यातील लाकीबुकी येथील भास्करराव गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून कार्यरत आहेत. […]
-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (ता.2 जानेवारी) बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पाटील यांनी आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याचा आढावा, एकलव्य कॉलेज ते मुंबई- पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्ता याबाबत आढावा घेतला. जनतेच्या सोयीसाठी राबवण्यात […]
-
जेम्स लेन, सावरकारांनी लिहिलेल्या लिखाणावर कोण बोलतं का? जितेंद्र आव्हाडांचं विरोधकांना खुलं चॅलेंज
ठाणे : छत्रपती शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त लिखाणाबाबत जेम्स लेन यांनी जे लिहिलंय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत, तसेच सावरकरांच्या सहा सोनेरी पानं आणि गोवलकरांच्या विचारधन पुस्तकात संभाजीराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केलंय, त्याबद्दल माझ्याशी बोलण्याची कोणाची हिम्मत आहे का? असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या […]
-
अजित पवारांना नव्याने इतिहास शिकवा, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची टीका
पुणे : मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मवीर असं संबोधलं आणि तुम्हीच म्हणताय की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अजित पवारांना नव्याने इतिहास शिकविला पाहिजे असल्याच टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. पाटील आज पुण्यात विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी […]









