- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
…तर लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकेल; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास
Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बैठका, मिटिंगा, आणि आढाव यावर सर्वच पक्षांनी भर दिला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तर वज्रमूठ सभा घेऊन धुराळाच उडवून […]
-
नथुराम गोडसेच्या देशभक्तीवर शंका घेणार नाही… : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं विधान
Trivendra Singh Rawat on Nathuram Godase : काही महिन्यांपूर्वी कालीचरण महाराज यांनी नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) उदात्तीकरण करून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींविषयी (Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेविषयी मोठं विधान केलं. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असं ते […]
-
Satara : ‘कार्यक्षम जिल्हाधिकारी’ पुरस्कार मिळाला अन् 48 तासांतच तडकाफडकी उचलबांगडी
Ruchesh Jayavanshi : सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांची काल तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांची जयवंशी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार (Efficient Collector Award of State Govt) मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत राज्य सरकारने जयवंशी यांची बदली केल्याने […]
-
दहावी, बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; वनरक्षक पदाच्या 2138 जागांसाठी भरती
Recruitment of Forest Guard Posts : प्रधान मुख्य वनरक्षक (Principal Chief Conservator of Forests) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ (Forest Guard Group-C’) च्या 2138 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. एवढ्या मोठ्या पदांच्या जाहिरातीमुळे अनेकांना संधी मिळेल. […]
-
Gitanjali Aiyer : दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर काळाच्या पडद्याआड
Gitanjali Aiyer Passed Away: आता पत्रकारिता विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अँकर गीतांजली अय्यर ( Gitanjali Aiyer) यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या. गीतांजली अय्यर यांचा आजवरच्या अनेक नामवंत वृत्त निवेदकांमध्ये समावेश होता. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर (Doordarshan) अँकरिंग केले. 1971 मध्ये ते दूरदर्शनशी […]
-
Crime : प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये बारीक केले… : घटना ऐकून अंगावर शहारे
Murder Of Live in Partner : काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील दोन घटनांनी संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीत आधी श्रद्धा वालकर आणि नंतर साक्षी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणाारी घटना मीरा रोडमध्ये (Meera Road) घडली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या एका प्रियकराने […]
-
Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा
Jitendra Awhad : शिवराज्यभिषेक (coronation) दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा (Aurangzeb) संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात काल हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रिया […]
-
Kolhapur : नागरिकांना शांततेचं आवाहान; इंटरनेट सेवा बंद : काय म्हणाले CM एकनाथ शिंदे?
CM Eknath Shinde : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या (Ahmednagar) फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. […]
-
Sharad Pawar : राज्य सरकारच लोकांना उचकवू लागले; संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा गंभीर आरोप
Sharad Pawar On Riot : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली (riot) उसळल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, शेवगाव येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्यात धार्मिक-जातीय तणावाच्या घटना वारंवार घडत आहेत. कालच एक घटना संगमनेरमध्ये (Sangamner) तर दुसरी घटना कोल्हापुरात घडली. या घटना जाणूनबुजून केल्या जात आहेत. राज्य सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा थेट […]
-
मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी, ‘इतके’च आमदार घेणार शपथ; अनेक इच्छुकांचा होणार हिरमोड
Cabinet expansion : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेरीस निघाला आहे. उद्या (8 जून रोजी) हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी […]









