संविधान बदलणार अन् 400 च्या नाऱ्याने गडबड झाली; लोकसभेतील पिछेहाटीवर शिंदे स्पष्टच बोलले

संविधान बदलणार अन् 400 च्या नाऱ्याने गडबड झाली; लोकसभेतील पिछेहाटीवर शिंदे स्पष्टच बोलले

Eknath Shinde on Mahayuti Setback in Loksabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election ) काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं 400 चा नारा सुद्धा देण्यात आला. हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली. अशी कबूली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीवर दिली आहे. ते शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतीविषयक मुद्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं. तसेच आजच्या बैठकीचा विषय गंभीर होता. त्यामुळे मी स्वतः हजर राहिलो आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. पण वेळेचं बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो.

आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे? आम्हालाही मंत्रिमंडळात स्थान द्या; सदाभाऊ खोतांची मागणी

तसेच यावेळी शिंदे यांनी सांगितलं की, बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे.तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. 2022 ला बांबू लावला होता. तेव्हा लावावा लागतो. यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो. सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते. एक विचारधाराची सरकार येणं गरजेचं होतं. मग नंतर भाजपा शिवसेना विचारधारेची नवीन सरकार आलं. असं म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा देखील साधला.

या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला थोडा मला रडवलं. मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं परंतु आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत याबाबत चर्चा केलेली आहे. काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं 400चा नारा सुद्धा देण्यात आला हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली. शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू. असंही शिंदे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज