उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे दाखवणार ताकद, शिंदे- फडणवीसांसह अजित दादांची हजेरी

उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे दाखवणार ताकद, शिंदे- फडणवीसांसह अजित दादांची हजेरी

Sujay Vikhe  : नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर (Abhay Agarkar) यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, 22 एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 11 वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंचपीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुतीतील घटक पक्ष, आणि मित्र पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.

हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube