मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे. अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या […]
पुणे : तेलंगणा राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटकेनं बाजी मारलीय. अभिजीतनं हरियाणाच्या सोमवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेनं यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. अभिजीतनं जिंकलेला हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी आणि तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे. […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या मांजरधाव प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय. जिल्हा परिषदेचे शिक्षक बाजीराव पानमंद यांनी आपल्या जागी एक खासगी बेरोजगार युवक कुलदीप जाधव याला शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमणूक केली. ग्रामस्थांनी […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. महाराष्ट्रात सध्या जे सुरु आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्यं केली जात आहेत. महाराष्ट्रात एवढे मोठे प्रश्न असताना नुसतीच निष्फळ बडबड केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहेत. कोणी कशावरही बोलायला लागलंय. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय, अशी […]