‘त्यांची लायकी… संपूर्ण महाराष्ट्राला माहिती’; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर

‘त्यांची लायकी… संपूर्ण महाराष्ट्राला माहिती’;  लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर

Sunil Tatkare Criticize Laxman Hake Allegation On Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) सातत्याने आरोप करत आहेत. याच आरोपांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व देता अशी टीका तटकरे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी हाके, डाके, पडळकर या लोकांना महाराष्ट्र जास्त महत्व देत नसल्याचं म्हटलंय

अजित पवार अर्थखात्याला चिकटून बसले आहेत. त्यांनीच ओबीसींचा (OBC) निधी अडवला, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. तसंच जर आपण बोलायला लागलो तर अजित पवार यांचे कपडेही राहणार नाही, असा थेट इशाराच हाकेंनी दिला (Maharashtra Politics) होता. यालाच आता सुनील तटकरे यांनी पद्धतशीर उत्तर दिलंय.

प्री वेडिंगवर बंदी ते दोनशेच लोकांमध्ये लग्न ! मराठा समाजाची आचारसंहिता

त्यांना कशाला महत्व द्यायचं?

सुनील तटकरे यांनी म्हटलंय की, ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कशाला महत्व द्यायचं. राज्याचे प्रमुख शेवटी मुख्यमंत्री असतातच अन् कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की, कोणत्याही प्रकारचा निधी दुसऱ्या खात्यात वळवला गेला नाही. इतर कुठल्याही खात्याच्या निधी कमी करण्यात आलेला नाही. अजितदादा उत्तम अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करत आहेत. अशी पावती जर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली असेल, तर हाके-पडळकर काय बोलतात, त्यांना कशाला महत्व द्यायचं? असं तटकरेंनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट

हाकेंवर बोलताना तटकरे यांनी म्हटलंय की, आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना काही नावं, विशेषणं दिली आहेत. मला ते शब्द बोलणं सुद्धा चांगलं वाटत नाही. त्यांची लायकी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की, तोल जाऊन कोण कुठं पडत होतं. त्यामुळं त्यांना जास्त महत्व देऊ नये, असं देखील तटकरे यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री कोण?

पालकमंत्री पदावर बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटलंय की, महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असलं पाहिजे, हा निर्णय संपूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. मुख्यमंत्री रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य असून एकनाथ शिंदे यांना मागणी करण्याचा अधिकार असल्याचं देखील तटकरेंनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube